आपण सारे अर्जुन... संभ्रम ते पूर्णत्व... व्.पु.काळे

अर्जुन आपल्या सगळ्यांना माहीत आहे... नाही का? लहानपनी, शाळेतल्या छान छान गोष्टी पासून ते आजीच्या गोष्टी मधे तो असायचा. प्रवचना पासून ते टी. व्ही. तल्या महाभारतामधे आपण तो पाहिलाय. तो विरोत्तम होता.. एक महान धनुर्धारी होता.. सुशिल..नम्र .. आदर्श असा मुलगा.. शिष्य.. भाऊ.. नवरा आणि महत्वाचे म्हणजे कृष्ण त्याचा सखा होता..

हे सगळं आपल्याला मुखोद्गत आहे असे म्हणायला हरकत नाही...
मग व.पु. नी असे काय वेगळे सांगीतलेय..?? 
आपण सारे अर्जुन?? 
म्हणजे?? 
हे सगळे गुण आपल्या सगळ्यात आहेत?

नाही..!! नक्कीच, हे सगळेच्या सगळे गुण आपल्यात नाहीत..!! पण एक कॉमन असा दुवा सगळ्यांमधे आहे..!!
मुळात हे पुस्तक, "भगवद्गीता" या वैचारिक ग्रंथाभोवती फिरते. हो.. हां महान ग्रंथ धार्मिक नहिये तर वैचारिक आहे. आत्म्याचा ठाव घेण्याआधीे मनाचि संभ्रमावस्ता काढून टाकन्याचे काम भगवद्गीता करते.
"आपण सर्व" आणि "अर्जुन" यामधे हेच एक साधर्म्य आहे.
संभ्रम.. Confusion..!

कृष्णाने गीता कोणत्या क्षणी सांगितली? अर्जुन "संभ्रमा मधे" सापडला होता. युद्धा मधे तर समोर शत्रु असतात, अगदीच शत्रु नसले तरी शत्रु चे मित्र पक्ष असतात. पण ईथे तर सगळे त्याचे "आपले" होते. गुरु विश्वामित्र, पितामह भीष्म हे तर त्याचे वंदनीय आदरस्थान होते. त्याचा संभ्रम असा होता, की या सगळ्या माझ्या माणसांना मारून मला "राज्य" मिळवायची खरच गरज आहे का? जरी युद्ध जिंकून मिळवले राज्य, तर पाठीवर कौतुकाची थाप टाकतील ते लोकच जगात नसतील तर हे राज्य काय करायचे.
आपली ही अर्जुनावस्था क्षणाक्षणाला होत असते...
- आज ही भाजी करू की ती करू?
- ऑफिस ला उशीर झाला.. ट्रेन ने जाऊ की बस ने जाऊ?
- रविवारी ट्रिप ला जाऊ की आराम करू?
- तो किंवा ती माझी काळजी करत नाही मग मी पण तसेच करू?
- मुलांसाठी असते, आई ची बाजू घेऊ की बायकोची? तर आईसाठी असते, नवरयाची ची बाजू घेऊ की मुलांची?
- श्रीमंताचा संभ्रम.. एखादा भिक मागतोय, देऊ की नको? गरीबाचा संभ्रम.. भीक मागून जगु, की कष्ट करुन?
- स्वताच्या मुलाने चोरी केली, त्याला शब्दाने समजावु की माराने? रस्त्यातल्या मुलाने चोरी केली तर संभ्रम नसतो फ़क्त मार..
- तो मला लांच मागतोय, देऊ की विरोध करू? किंवा तो मला लांच देऊ करतोय, फुकटचा पैसा आहे घेऊ की तत्वानिष्ठ राहु?

असंख्य....
गूगल च्या सर्वर ची पण अर्जुनावस्था होईल. इतकी मोठी लिस्ट सेव्ह करू की नको?
Bottom line.. हे जग पहिल्या पासून आत्ता पर्यन्त संभ्रमात आहे. असेही म्हणू शकतो की रोज नविन विचार येतात त्यामुळे संभ्रम तयार होतात आणि म्हणूनच जीवनामधे पण मसाला तयार होतो. सरळ रेषा म्हणजे जीवन नव्हे.

अर्जुन संभ्रमात पड़ला कारण त्याने "विचार" केला.. तो विचारोत्तम होता.. आपण बऱ्याच वेळा विचार करतो ती फ़क्त काळजी च्या रूपाने. सगळ्यात महत्वाचे म्हणजे अर्जुनाला त्याचा संभ्रम दूर करायला सखा "कृष्ण" भेटला. आपल्याला ही भेटु शकतो. चांगल्या मनाने जग पहां. जरूर मिळेल. मला "पुस्तक" हां "कृष्ण" मिळाला. आयुष्याचा सारथी. व. पु. नी या पुस्तकामधे जीवनतल्या छोट्या गोष्टींचा विचार योग्य दृष्टीने करुन, जीवन मोठे कसे करावे याचा विलक्षण आढावा घेतला आहे.

अजुन एक महत्वाची खंत व. पु. व्यक्त करतात, की भगवद्गीते सारखा महत्वाचा मार्गदर्शक ग्रंथ युवकांपर्यंत पोहोचला नाही. भारतातील 99 टक्के पेक्षा जास्त लोकांनी, भगवद्गीता जाणून घ्यायची सोडा तर उघडून पण पाहिली नसेल. आपल्यात अध्यात्म हे म्हातारे झाल्यावर जेव्हा करायला काहीही नसते त्यावेळी कराण्याचि गोष्ट आहे.
म्हणजे, आदर्श आणि सुखी जीवन जगावे कसे, याचे मार्गदर्शन आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजताना आणि ज्या वयात, आपण सकाळी काय नाश्ता केला हे दुपारी लक्षात राहत नाही, अशा वयात घ्यावे.
हास्यास्पद..!!

हे पुस्तक वाचून तरी एकदा आपल्या देशातील काही युवक तरी भगवद्गीता जाणून घ्यायला तयार होवोत ही प्रार्थना..

हां लेख वाचल्याबद्दल धन्यवाद..!!

Comments